सर्वात कठीण काम सर्वात आधी करा......!
अतिशय महत्त्वाची आणि अवघड काम हाता वेगळी करा..... आज, आत्ता, ताबडतोब....! यासाठी गरज आहे नियोजनाची. नियोजन म्हणजे भविष्याला वर्तमानात आणणे जेणेकरून तुम्ही आजच त्याबद्दल काहीतरी ठोस कृती करू शकाल.हे मी "ब्रायन ट्रेसी" यांनी लिहिलेल्या "सर्वात कठीण काम सर्वात आधी करा" या पुस्तकाबद्दल बोलतोय.....!
आपल्याकडे कामांची लांबलचक यादी नेहमीच तयार असते आणि त्यातील सगळ्याच गोष्टी पार पाडण्यासाठी आवश्यक तो वेळ आपल्यापाशी कधीच उपलब्ध नसतो. अर्थातच पुढेही तो कधीच नसेल. यासाठी यशस्वी लोक अत्यंत महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करतात व ती तत्परतेने पूर्ण करतात.
सध्याचा काळ हा सर्वोत्तम आहे.आपली ध्येय साध्य करण्यासाठी जेवढ्या संधी आणि शक्यता आज उपलब्ध आहेत, तेवढ्या याआधी कधीच नव्हत्या. मानवी इतिहासात बहुदा पहिल्यांदाच आपण पर्यायांच्या महासागरात डुंबच आहोत. किंबहुना एवढ्या चांगल्या गोष्टी आजूबाजूला आहेत की, जीवनात आपण नक्की काय आणि किती साध्य करणार हे सर्वस्वी आपल्या निवड क्षमतेवर अवलंबून आहे.
असं असूनही तुम्ही आताच्या सर्वसाधारण लोकांसारखेच असाल,"तर रात्र थोडी सोंग फार" या चक्रात तुम्ही अडकलेले असणार हे नक्की ! समुद्रात जशी एक लाख फुटते न फुटते तोच दुसरी मागून येते, त्याप्रमाणे तुम्ही हातातील एक काम मार्गी लावतात तोवर दुसरा पुढ्यात येऊन ठेपतं. यामुळे आपल्याला जे जे करायचं आहे, ते सगळं पार पाडणं तुम्हाला कधीच शक्य होत नाही. यासाठी काय बर कराव लागेल...! हेच या पुस्तकातून "ब्रायन ट्रेसी" आपल्याला समजून सांगतायेत.
असे पाहण्यात आले आहे की, जवळपास 80 टक्के किंवा अधिक वेळा लोकांची तीन ध्येय अगदी एकसारखी असतात. मुख्य म्हणजे ते अगदी योग्यही आहे. प्रत्येकाची हीच तीन मुख्य ध्येय असायला हवीत: पहिलं म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि करियर; दुसरं म्हणजे कुटुंब आणि वैयक्तिक नातेसंबंध आणि तिसरं म्हणजे वैयक्तिक आरोग्य आणि तंदुरुस्ती. "सर्वात कठीण काम सर्वात आधी करा" हे पुस्तक म्हणजे "ब्रायन ट्रेसी" यांच्या "Eat That Frog" पुस्तकाचा अनुवाद आहे. या पुस्तकांमध्ये ब्रायन ट्रेसी यांनी कमीत कमी वेळेत अधिकाधिक काम करण्यासाठीचे 21 प्रभावी मार्ग सांगितलेले आहेत. त्यापैकी काहींचा उल्लेख येथे प्रामुख्याने करावा लागेल. यामध्ये "ब्रायन ट्रेसी" यांनी असं म्हटलेलं आहे की, सगळे शारीरिक आणि मानसिक स्त्रोत जेव्हा एकवटले जातात तेव्हा समस्या सोडवण्याची ताकद कित्येक पटीने वाढते, म्हणजेच एखाद्या कार्यात जितक्या प्रमाणात सामर्थ्य एकवटलं जातं त्यातच मनुष्याच्या यशाचं आणि महानतेच रहस्य दडलेलं असतं.
Comments
Post a Comment